हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन
9000+
Cashless Hospitals
2.5 Crore+
Lives Insured
4.5 Lacs+
Claims Settled
I agree to the Terms & Conditions
Get Exclusive Porting Benefits
Buy Health Insurance, Up to 20% Discount
Port Existing Policy
9000+
Cashless Hospitals
2.5 Crore+
Lives Insured
4.5 Lacs+
Claims Settled
जनश्री बिमा योजनेबद्दल सर्व काही
जनश्री बिमा योजना ही दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी लाइफ इन्शुरन्स प्लॅन आहे. या लेखात जनश्री बिमा योजनेचे कव्हरेज आणि शिक्षा सहयोग योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या विविध विशेष भत्त्यांबद्दल चर्चा करण्यात आली आहे.
जर आपण या योजनेचा फायदा घेण्याचा विचार करीत असाल किंवा इतर कोणाला तपशील देऊ इच्छित असाल तर हा लेख आपल्या शंकांचे निरसन करण्यासाठी योग्य जागा आहे! आम्ही संपूर्ण योजनेचा सविस्तर आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह आढावा घेतला आहे.
काय आहे जनश्री बिमा योजना?
भारत सरकार आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाने 2000 मध्ये जनश्री बिमा योजना सुरू केली. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना लाइफ इन्शुरन्स उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी ही योजना तयार केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा कार्यक्रम दारिद्र्य रेषेखालील किंवा किंचित वरच्या व्यक्तींना लक्ष्य करतो.
सध्या या योजनेत पंचेचाळीस विविध व्यावसायिक गटांचा समावेश आहे. यात आता सामाजिक सुरक्षा ग्रुप इन्शुरन्स योजना आणि ग्रामीण ग्रुप लाइफ इन्शुरन्स प्लॅन या पूर्वी प्रचलित असलेल्या दोन सिस्टम्सचा समावेश आहे.
आम्हाला आशा आहे की यामुळे जनश्री बिमा योजना म्हणजे काय हे आपले आकलन स्पष्ट होईल!
जनश्री बिमा योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत?
जनश्री बिमा योजनेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
- एलआयसी च्या सहकार्याने सुरू केलेली ही सरकारी इन्शुरन्स योजना आहे.
- हा कार्यक्रम दारिद्र्य रेषेवरील किंचित वर असलेल्या किंवा त्याखालील लोकांना लक्ष्य करतो.
- प्रति व्यक्ति प्रीमियम रु. 200 आहे.
- अर्जदार किंवा राज्य सरकार किंवा नोडल एजन्सी प्रीमियमच्या सुमारे 50% भरते.
- उर्वरित 50% रक्कम सोशल सिक्युरिटी फंड देते.
- बचत गट, स्वयंसेवी संस्था, पंचायती किंवा इतर संस्थात्मक एजन्सींना नोडल एजन्सी मानले जाऊ शकते.
- जनश्री बिमा योजना महिला बचत गट सदस्यांना अनन्य सेवा देते. ही योजना त्यांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करते, एक वर्षासाठी रु. 30,000 देते.
- ज्या मुलांचे पालक जेबीवाय चे भागीदार आहेत त्यांच्यासाठीही तरतूद आहे. 11वी किंवा 12वी शिकणाऱ्या प्रत्येक कुटुंबातील दोन मुलांना दर सहा महिन्यांनी रु. 600 ची शिष्यवृत्ती मिळू शकते.
जनश्री बिमा योजनेचे फायदे काय आहेत?
कोणतीही योजना निवडण्यापूर्वी लोकांना तिचे फायदे जाणून घेणे नेहमीच आवडते. जनश्री इन्शुरन्स योजनेचे काही फायदे येथे आहेत.
- नैसर्गिक मृत्यू झाल्यास लाभार्थीला रु 30,000 दिले जातील.
- अपघातामुळे मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास देण्यात येणारी नुकसान भरपाई रु. 75,000 इतकी आहे.
- अपघाता मुळे अंशत: अपंगत्व आल्यास रु. 37,500 ची रक्कम दिली जाते.
जेबीवाय किंवा जनश्री बिमा योजनेच्या कव्हरेज घेण्याचे हे फायदे आहेत.
जनश्री बिमा योजनेअंतर्गत कोणत्या खास योजना दिल्या जातात?
जेबीवाय कार्यक्रमात इन्शुरन्स कव्हरेज व्यतिरिक्त काही विशेष सवलती देखील दिल्या जातात. ते खालीलप्रमाणे आहेत:
महिला एसएचजी (सेल्फ हेल्प ग्रुप्स) विषयी आवश्यक माहिती
या योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांना अनेक फायदे दिले जातात. यामुळे त्यांना मुलांच्या शिक्षणासाठी मदत होते. रु 30,000 चे कव्हरेज देणारी टर्म इन्शुरन्स प्लॅन आहे. ही रक्कम वर्षभरासाठी दिली जाते. लाभार्थ्यांना वार्षिक प्रीमियम म्हणून रु. 200 भरावे लागतील. महिला सदस्य रु. 100 देते आणि एलआयसी उर्वरित रु.100 रुपये देते.
शिक्षा सहयोग योजनेबद्दल आवश्यक माहिती
या योजनेत काही ठराविक मुलांचाच समावेश आहे. त्यांचे पालक जेबीवाय चे सदस्य असावेत. 11वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना दर सहा महिन्यांनी रु.600 शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती प्रत्येक घरात फक्त दोन मुलांना दिली जाते.
जनश्री बिमा योजनेत कोणते वेगवेगळे ग्रुप्स कवर्ड आहेत?
जेबीवाय गटात कामगारांच्या सुमारे पंचेचाळीस वेगवेगळ्या श्रेणींचा समावेश आहे. ते खाली दिलेल्या तक्त्यात दाखविले आहेत.
कामगारांच्या 45 प्रवर्गांची यादी:
अंगणवाडी सेविका व मदतनीस
बिडी कामगार
शेतकरी
वीटभट्टी कामगार
बागायती कामगार
कोळी
कागद उत्पादने बनवणाऱ्या कंपन्या
यंत्रमाग कामगार
शारीरिक दृष्ट्या अपंग स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्ती
सुतार
एसईडबल्युए शी संलग्न पापड कामगार
मातीची खेळणी उत्पादक
नारळावर प्रक्रिया करणारे
प्रिंटिंग प्रेस कामगार
ग्रामीण भागातील गरीब
शहरी गरिबांसाठी योजना
रबर आणि कोळसा उत्पादक
कंपन्यांमधील कामगार मेणबत्तीसारखी रासायनिक उत्पादने बनवणाऱ्या कंपन्यांमधील कामगार
प्राथमिक दूध उत्पादक
बांधकाम मजूर
फटाके कामगार
सफाई कामगार
चांभार
मीठ उत्पादक कंपन्यांमधील कामगार
खांडसरी/साखरेसारख्या खाद्यपदार्थांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमधील कामगार
रिक्षा खेचणारे/रिक्षाचालक
हातमाग विणकर
पर्वतीय क्षेत्रातील स्त्रिया
हातमाग आणि खादी विणकर
ताडी काडणारे
टेक्सटाइल
तेंदूपत्ता संग्राहक
जंगलात काम करणारे कामगार
हाताने कलाकुसर करणारे कलाकार
हमाल
सेरीकल्चर
मेंढ्या पाळणारे
ट्रान्सपोर्ट चालक संघ सदस्य
कोतवाल
चामड्याच्या उत्पादनांच्या निर्मितीत गुंतलेले कामगार
स्त्रिया शिंपी
चामडे आणि टॅनरी कामगार
ट्रान्सपोर्ट कर्मचारी
खाद्य पदार्थांच्या निर्मितीत गुंतलेले कामगार
बचत गटाशी संबंधित महिला
जनश्री बिमा योजनेसाठी पात्रता निकष काय आहेत?
जेबीवाय साठी पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत.
- व्यक्तीचे वय 18 ते 59 वर्षांच्या दरम्यान असावे.
- एखादी व्यक्ती दारिद्र्य रेषेखालील किंवा त्याच्या किंचित वरती असावी.
- सदस्यसंख्या किमान 25 असावी.
- शक्यतो कोणत्याही नोडल एजन्सी किंवा व्यावसायिक गटाचे सदस्य असावे.
जनश्री बिमा योजनेसाठी अर्ज कसा करावा?
जनश्री इन्शुरन्स योजना ऑनलाईन अर्ज – https://www.pdffiller.com/29825639-fillable-janshri-bima-yojanamp-form डाऊनलोड आणि प्रिंट करण्यासाठी तुम्ही या लिंकचा वापर करू शकता. तसेच, एखादी व्यक्ती नोडल एजन्सी किंवा ज्या बचत गटाचा भाग आहे त्या द्वारे अर्ज करू शकते. अर्ज करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे कोणत्याही एलआयसी कार्यालयाद्वारे आहे.
जनश्री बिमा योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल कामगार आणि त्यांच्या मुलांना इन्शुरन्स पॉलिसी देणे हा आहे. या योजनेचा फायदा महिला व बालकांना आर्थिक मदत देऊन होतो.